पुणे : ‘ग्रंथ तुमच्या दारी’ योजनेतील एक अनोखा उपक्रम पाच आणि सहा ऑगस्ट रोजी वारजे येथे आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत वाचकांनी त्यांना आवडलेले पुस्तक मोफत घेऊन जायचे आहे आणि त्या बदल्यात आपल्याकडील एक पुस्तक द्यायचे आहे. नाशिकचे कुसुमाग्रज प्रतिष्ठान व वारजे येथील आदित्य गार्डन सिटी सोसायटीने संयुक्तपणे हा उपक्रम हाती घेतला आहे.
या निमित्ताने सोसायटीच्या सभागृहात रविवारी सायंकाळी चार वाजता ‘गप्पा टप्पा’ हा ‘मनकल्लोळ’कार नीलांबरी जोशी यांचा कार्यक्रम होणार असून, त्याला ज्येष्ठ कलावंत धनंजय देशपांडे उपस्थित राहणार आहेत.
‘या कार्यक्रमाचा आणि ‘पुस्तक घ्यावे! पुस्तक द्यावे!!’ योजनेचा पुणेकर वाचनप्रिय रसिकांनी अवश्य लाभ घ्यावा,’ असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या योजनेत शैक्षणिक पुस्तके, मासिके घेतली जाणार नाहीत, असे आयोजकांनी कळविले आहे.
संपर्क :
श्यामराव पाठक : ८४०८८ १६६००
विरजा दिवेकर : ९८५०५ ९६६६९
कार्यक्रमाविषयी :
दिवस : शनिवार, पाच ऑगस्ट २०१७
वेळ : सायंकाळी पाच ते रात्री आठ
रविवार, सहा ऑगस्ट २०१७
वेळ : सकाळी दहा ते सायंकाळी सहा
गप्पा टप्पा कार्यक्रम
रविवारी सायंकाळी चार वाजता
स्थळ : आदित्य गार्डन सिटी , आरएमडी सिंहगड कॉलेजजवळ, वारजे, पुणे
संपर्क : विनायक रानडे, कुसुमाग्रज प्रतिष्ठान
मोबाइल : ९९२२२ २५७७७
व्हॉट्सअॅप : ९४२३९ ७२३९४